मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा
कल्याण : कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, 4 मे रोजी संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठी सक्तीच्या विरोधात काही संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर (मनसे) आक्रमक झाली आहे.
मराठी भाषेच्या सन्मानाच्या मुद्द्यावर मनसेने ठाम भूमिका घेत, विरोधकांना “मनसे स्टाईल”ने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. मराठी रिक्षा चालकांना त्रास दिला गेला किंवा मराठी भाषेचा अवमान झाल्यास कठोर प्रतिक्रिया दिली जाईल, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसेच्या शिष्टमंडळाने आरटीओ कल्याण येथे भेट देत प्रशासनाला निवेदन सादर केले. माजी आमदार Raju Patil यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ गेले होते. सार्वजनिक सेवा क्षेत्रात मराठीचा वापर अनिवार्य असतानाही अनेक चालक नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनसेने प्रशासनाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये —
रिक्षा-टॅक्सी चालकांची मराठी ज्ञान तपासणी
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
परवाना नूतनीकरणात मराठीची अट सक्तीने लागू करणे
मीटरनुसार प्रवासासाठी स्वतंत्र व्यवस्था
शेअरिंग रिक्षांसाठी अधिकृत थांबे
प्रवास नाकारणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करणे
याशिवाय, मराठी रिक्षा चालकांना ओळख देण्यासाठी वाहनांवर विशेष स्टिकर्स लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, योगेश पाटील आणि अरुण जांभळे यांनी दिला आहे. त्यामुळे 4 मे रोजी कल्याणमध्ये काय
