Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत. हजारोंच्या घरात खरातने महिलांवर अत्याचार केला. महिला मानसिक धक्क्यात आहेत. काही मोबाईल फोन खरात वापरत, त्या फोनमध्ये महिलांचे नंबर इतर नावाने सेव्ह असत. अशोक खरात याला अजिबात सोडू नये, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी मागणी केली. सुनील तटकरे यांनी म्हटले की, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, सरकारने एसआयटीच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही सुनील तटकरे यांनी म्हटले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले.

जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल केलेल्या विधानावर बोलताना सुनिल तटकरे यांनी म्हटले की, अजित पवारांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही समाधानी नाहीत. जय पवार अगोदरच पत्रकार परिषद घेणार होते. त्यांनी बारामतीलाच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही कोणीही समाधानी नाहीत, या प्रकरणात ज्या ज्या राजकीय प्रतिनिधींनी ज्या ज्या प्रकारे तपास करण्याची मागणी केली आहे त्या प्रकारे तपास समोर यावा अशी आमची मागणी आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, याकरिता उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. शिवसेना शिंदे गटानेही निवडणूक बिनविरोध घेण्याची भूमिका घेतली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version