Spread the love

द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन – भगवान बुद्धांचे आदर्श आत्मसात करून न्याय्य व सर्वसमावेशक समाज घडवूया

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या की, हा पवित्र दिवस भगवान बुद्धांचे पृथ्वीवरील आगमन, त्यांना मिळालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या ऐतिहासिक घटनांचे प्रतीक आहे. त्या म्हणाल्या की, बुद्धांचे करुणा, अहिंसा, शांती आणि ज्ञानाचे शाश्वत संदेश संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत राहतील.

अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या आजच्या जगात, भगवान बुद्धांची शिकवण प्रत्येकाला शांती, सहिष्णुता आणि परस्पर सौहार्दाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते. त्यांनी लोकांना भगवान बुद्धांचे आदर्श आत्मसात करण्याचे आणि शांततापूर्ण, सर्वसमावेशक व न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version