एलपीजी सिलिंडर दरवाढीचे समर्थन
बलिया (उत्तर प्रदेश) : “यादवांनी दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार केला,” असे उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, यादवांनी सर्वप्रथम मुघल सैन्यात सामील होऊन मागास वर्ग, दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार केले आणि नंतर ब्रिटिश सैन्यातही तीच भूमिका बजावली.
उत्तर प्रदेशात आजही यादवांकडून अत्याचाराच्या घटना सुरू असल्याचा आरोप राजभर यांनी केला. यासाठी त्यांनी बाराबंकी आणि मऊ येथील घटनांचा उल्लेख केला. शनिवारी रसरा येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
एलपीजी सिलिंडर दरवाढीचे समर्थन
स्मार्ट मीटरबाबत सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर राजभर म्हणाले की, अखिलेश यादव यांचे आता फक्त पत्रकार परिषदा घेणे आणि सोशल मीडियावर लिहिणे, हेच काम उरले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, जे लोक महागाईबद्दल आरडाओरडा करतात, त्यांनी १५ वर्षे मागे जाऊन परिस्थितीशी तुलना करावी. राजभर यांनी दावा केला की, गावांमध्ये मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढली असून लोकांची क्रयशक्तीही वाढली आहे.
