Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»महाराष्ट्र»“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”
महाराष्ट्र

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

 टिटवाळ्यात 'जन सम्राट टाईम्स'च्या प्रकाशन सोहळ्यात ना. गुलाबराव पाटील यांचे भावनिक आवाहन
Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

टिटवाळा : “आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे हे ध्येयवेड्या माणसाचे काम आहे. मुकुंद नन्नवरे हा संघर्षातून उभा राहिलेला माझा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी माझा हा मुकुंद आता टिटवाळा आणि मुंबईकरांच्या हवाली केला आहे, त्याला आपले मानून खंबीर साथ द्या,” असे भावनिक आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. निमित्त होते, टिटवाळा येथे पार पडलेल्या दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’ च्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्याचे.

रविवार, ५ एप्रिल रोजी टिटवाळा येथील सिद्धेश्वर हाईट्स मैदानावर हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’च्या कार्यालयाचे उद्घाटन, वेबसाईटचे अनावरण आणि वृत्तपत्राचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.

बातम्यांची खातरजमा करणारी यंत्रणा हवी!
प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित जाहीर सभेत ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. ते म्हणाले की, “वृत्तपत्रांनी समाज घडविण्याचे काम करावे. सध्या बातम्या ट्विस्ट करून किंवा स्वतःच्या पदरचे घालून देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जातो. प्रत्येक वृत्तपत्र कार्यालयात बातमीची सत्यता पडताळणारी (फॅक्ट-चेक) स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. वस्तुस्थिती मांडणारी पत्रकारिताच टिकते.”

४०० किमीचा प्रवास आणि १२ वर्षांचे नाते
मंत्री महोदयांनी यावेळी आपल्या आणि संपादक मुकुंद नन्नवरे यांच्यातील १२ वर्षांच्या स्नेहबंधांना उजाळा दिला. “निवडणूक काळात व्यस्त असूनही केवळ मुकुंदच्या आग्रहाखातर मी ४०० किलोमीटरचा प्रवास करून येथे आलो आहे. तो ध्येयवेडा आहे, मी त्याला पेपर काढू नको म्हणून खूप समजावले, पण त्याने ऐकले नाही. आता तो या प्रवासात उतरलाच आहे, तर एक ‘भाऊ’ म्हणून मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशा शब्दांत त्यांनी पाठबळ दिले.

सामाजिक चळवळींना व्यासपीठ देण्याचा निर्धार
संपादक मुकुंदराव नंन्नवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात वृत्तपत्राची भूमिका मांडली. “गेल्या ३० वर्षांच्या सामाजिक चळवळीत आणि २० वर्षांच्या पत्रकारितेत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सर्वसामान्यांच्या आणि चळवळीच्या बातम्यांना मुख्य प्रवाहात जागा मिळत नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी ‘जन सम्राट टाईम्स’चे रणशिंग फुंकले आहे,” असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याची वैशिष्ट्ये:
* मान्यवरांची मांदियाळी: ज्येष्ठ नेते तानसेनभाई नन्नवरे, आरपीआयचे अण्णासाहेब रोकडे, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, समाजभूषण राजू झनके यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
* राजकीय टोलेबाजी: “आता कोणता नेता कधी कोणत्या पक्षात असेल याचा नेम उरलेला नाही,” अशी टिप्पणी करत ना. पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल भाष्य केले. तसेच “आम्ही ‘मार्मिक’ वाचून घडलो,” असे सांगत जुन्या काळच्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला.
* महामानवांना अभिवादन: सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सपकाळे यांनी केले, तर सोहळा यशस्वी करण्यासाठी धीरज सोनवणे, गोविंद नन्नवरे यांच्यासह ‘जन सम्राट’च्या टीमने विशेष परिश्रम घेतले. पुढील वर्षाचा वर्धापन दिन कल्याणच्या बंदिस्त सभागृहात भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्पही यावेळी सोडण्यात आला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी
Next Article रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

April 6, 2026

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अखेर पुतळा हटविला !! खुप खूप अभिनंदन

By Jansamrattimes@gmail.comApril 6, 20260
Spread the love

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीत अकस्मात उभारण्यात आलेला महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा…

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६

April 6, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वर्किंग कमिटीची बैठक पुण्यात संपन्न

April 6, 2026

“माझा मुकुंद आता तुम्हाला सोपवलाय, त्याला साथ द्या!”

April 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?